• मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म
Sunday, October 12, 2025
  • Login
News Disha
  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म
No Result
View All Result
News Disha
No Result
View All Result
Home दिल्ली

आंतरराष्ट्रीय व्यापार स्वेच्छेने व्हावा, दडपणाखाली नव्हे : सरसंघचालक

News Disha by News Disha
August 29, 2025
in दिल्ली
0
आंतरराष्ट्रीय व्यापार स्वेच्छेने व्हावा, दडपणाखाली नव्हे : सरसंघचालक
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on TwitterShare On Whatsapp
Post Views: 6,226

तीन दिवसीय व्याख्यानमालेचा दुसरा दिवस – ‘संघाची १०० वर्षांची यात्रा : नवे क्षितिज’

नवी दिल्ली : समाज आणि जीवनातील समतोलच खरे धर्म आहे, जो कोणत्याही अतिरेकापासून आपल्याला वाचवतो. भारताची परंपरा यालाच मध्यम मार्ग म्हणते आणि आजच्या जगासाठी हेच अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी सांगितले की, जगासाठी आदर्श बनण्यासाठी समाजपरिवर्तनाची सुरुवात घरापासून करावी लागेल. यासाठी संघाने ‘पंच परिवर्तन’ सुचवले आहेत – कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, स्व-बोध (स्वदेशी) आणि नागरिक कर्तव्यांचे पालन.“आत्मनिर्भर भारतासाठी स्वदेशीला प्राधान्य द्या आणि भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार केवळ स्वेच्छेनेच व्हावा, कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली नाही.” असे स्पष्ट शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले आहेत.

डॉ. मोहन भागवत हे विज्ञान भवन येथे संघ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित तीन दिवसीय व्याख्यानमालेच्या (‘संघाची १०० वर्षांची यात्रा – नवे क्षितिज’) दुसऱ्या दिवशी बोलत होते. या वेळी सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे, उत्तर क्षेत्रप्रमुख पवन जिंदल आणि दिल्ली प्रांतप्रमुख डॉ.अनिल अग्रवाल मंचावर उपस्थित होते.

संघाचे कार्य कसे चालते?

मोहन भागवत म्हणाले, “संघाचे कार्य हे शुद्ध सात्त्विक प्रेम आणि समाजनिष्ठेवर आधारित आहे. संघाचा स्वयंसेवक कधीच वैयक्तिक लाभाची अपेक्षा करत नाही. इथे प्रोत्साहन (इन्सेन्टिव) नाही, उलट त्याहून अधिक अप्रत्यक्ष अडचणी आहेत. स्वयंसेवक समाजकार्य करताना आनंद अनुभवतात.” त्यांनी स्पष्ट केले की, जीवनाची सार्थकता आणि मुक्तीची अनुभूती ह्या सेवेमधूनच मिळते. सज्जनांशी मैत्री, दुर्जनांची उपेक्षा, चांगले करणाऱ्याबद्दल आनंद व्यक्त करणे आणि दुर्जनांप्रतीही करुणा बाळगणे – हेच संघाचे जीवनमूल्य आहे.

हिंदुत्व म्हणजे काय?

हिंदुत्वाबद्दल ते म्हणाले, “हिंदुत्व म्हणजे सत्य, प्रेम आणि आपुलकी.” आपल्या ऋषी-मुनींनी आपल्याला शिकवले आहे की जीवन हे केवळ स्वतःसाठी नसते. म्हणूनच भारताने जगासाठी मार्गदर्शक होण्याची भूमिका निभावली पाहिजे. येथूनच ‘वसुधैव कुटुंबकम्’ आणि ‘विश्वकल्याण’ यांची संकल्पना जन्माला येते.जग कुठल्या दिशेने जात आहे ?सरसंघचालकांनी चिंता व्यक्त केली की, जग हे अतिरेकीपणा, संघर्ष आणि अशांततेच्या दिशेने चालले आहे. मागील साडेतीनशे वर्षांत उपभोगवाद आणि भौतिकतावादामुळे मानवतेची पातळी घसरली आहे.

महात्मा गांधींनी सांगितलेल्या ‘सात सामाजिक पापां’चा त्यांनी उल्लेख केला –1. कामाशिवाय संपत्ती,2. विवेकाशिवाय आनंद,3. चारित्र्याशिवाय ज्ञान,4. नैतिकतेशिवाय व्यापार,5. मानवतेशिवाय विज्ञान,6. बलिदानाशिवाय धर्म,7.तत्त्वांशिवाय राजकारण –हे पाप समाजात असमतोल निर्माण करतात.धर्माचा मार्ग स्वीकारणे आवश्यकसरसंघचालक म्हणाले की, “आज जगात समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे जगाने आपला दृष्टिकोन बदलायला हवा. जगाने धर्माचा मार्ग स्वीकारावा लागेल. इथे धर्म म्हणजे पूजा-पाठ किंवा केवळ कर्मकांड नव्हे. सर्व धर्मांपेक्षा श्रेष्ठ असा धर्म म्हणजे समतोल. आपणही जगावे, समाजही जगावा आणि निसर्गालाही जपावे.”धर्म म्हणजे मर्यादा आणि समतोलासह जगणे. हेच दृष्टिकोनानेच जगात शांती प्रस्थापित होऊ शकते.

धर्माची व्याख्या“धर्म म्हणजे तो मार्ग जो आपल्याला संतुलित जीवनाकडे घेऊन जातो, विविधतेला स्वीकारतो आणि सर्वांच्या अस्तित्वाचा आदर करतो. हेच खरे विश्वधर्म आहे आणि हिंदू समाजाने संघटित होऊन तो जगासमोर मांडायला हवा.”जगाची सद्यस्थिती आणि उपायवैश्विक पातळीवर ते म्हणाले की, “शांती, पर्यावरण आणि आर्थिक विषमता यावर चर्चा होत आहे, उपाय सुचवले जात आहेत, पण समाधान अजूनही दूर आहे.”त्यासाठी त्याग, बलिदान आणि प्रामाणिक विचार आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

भारताने संयम दाखवलासरसंघचालक म्हणाले की, “आपल्यावर नुकसान झाले तरी भारताने संयम राखला आहे. ज्यांनी आपल्याला त्रास दिला, त्यांनाही संकटात मदत केली आहे. अहंकारातून शत्रुत्व निर्माण होते, पण भारत अहंकारापलीकडे आहे.” “संघ जे बोलतो, ते समाज ऐकतो” – हे संघाच्या सेवा व समाजनिष्ठेमुळे मिळालेले आहे.भविष्याची दिशासंघाचे उद्दिष्ट आहे की, संघकार्य सर्व ठिकाणी, सर्व स्तरांवर पोहोचावे. समाजात चांगले कार्य करणारी सज्जनशक्ती एकत्र यावी. यासाठी संघाने सज्जन शक्तीशी संपर्क ठेवण्याचा संकल्प केला आहे. संघ समाजाच्या स्वभावात सकारात्मक परिवर्तन घडवू इच्छितो. ओपिनियन मेकर्सशी सतत संवाद ठेवून एक सकारात्मक विचारधारा रुजवायची आहे.

विविधतेतील एकताभागवत म्हणाले की, “जे धार्मिक विचार भारतात बाहेरून आले, ते काही लोकांनी काही कारणांमुळे स्वीकारले. तेही आपलेच आहेत. पण परकीय विचारांमुळे जी दुरावे निर्माण झाले, ती दूर करण्याची गरज आहे.” आपल्याला इतरांच्या वेदनाही समजून घ्याव्या लागतील. एक देश, एक समाज, एक राष्ट्र म्हणून, समान पूर्वज आणि सांस्कृतिक वारसा असताना आपल्याला एकत्रच पुढे जायचं आहे.”

Tags: Mohan bhagwatRssRss complete 100 yearराष्ट्रीय स्वयंसेवक संघसरसंघचालक मोहन भागवत
Previous Post

उरण-नेरूळ रेल्वेला नवे बळ, फेऱ्या वाढणार : महेश बालदी

Next Post

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात आरोग्य तपासणी

Next Post
गरीबांच्या वैद्यकीय ‘सहाय्यता निधीवर’ डल्ला मारणाऱ्या तीन डॉक्टरांवर गुन्हा दाखल

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात आरोग्य तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • मंडणगड न्यायालय इमारतीचे मा. सरन्यायाधीश भूषणजी गवई यांच्या हस्ते लोकार्पण
  • ठाकरे बंधूंच्या ठाण्यातील मोर्चाला पवार गटाचे बळ
  • मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी ठाण्याहून मदतीचा हात
  • माहिती अधिकार कायद्याला कमजोर करण्याचा डाव हाणून पाडा
  • सामाजिक लोकशाहीशिवाय राजकीय लोकशाही टिकू शकत नाही : उपमुख्यमंत्री शिंदे

Recent Comments

  1. शरद वसंतराव भसाळे on ठाणे जिल्ह्यातील प्रसारमाध्यम प्रतिनिधींकरिता ‘पत्रकारितेची पाठशाळा’ कार्यशाळेचे आयोजन
  2. अनिल अहिरे on सरकारी शाळांमध्ये आता कंत्राटी पद्धतीने शिपाई भरती

Categories

  • ठाणे
  • दिल्ली
  • पुणे
  • मुंबई
  • संपादकीय
  • सोलापूर

Browse by Category

  • ठाणे
  • दिल्ली
  • पुणे
  • मुंबई
  • संपादकीय
  • सोलापूर
  • About Us
  • Contact Us

© 2023 Mahaweb Technologies - Copyright by Mahaweb Technologies.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म

© 2023 Mahaweb Technologies - Copyright by Mahaweb Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
slot slot gacor slot gacor maxwin 2024 Situs Slot777 http://lightfootbranding.com/ Slot777 slot slot Slot Gacor Hari Ini https://ikon.bpip.go.id/admin/css/sl-ot/ https://ikon.bpip.go.id/admin/css/sl-ot-4d/ https://keringanan-ukt.upr.ac.id/assets/img/server-thailand/ https://keringanan-ukt.upr.ac.id/assets/img/sg-pulsa-tri/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-pulsa-tri/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/server-thailand/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-4d/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-88/ https://cyberschool.denpasarkota.go.id/assets/sg-max/ https://cyberschool.denpasarkota.go.id/assets/sg-pulsa-tri/ slot thailand gacor slot gacor maxwin slot online pay4d slot mpo gacor slot777 maxwin slot thailand slot thailand gacor https://128.199.151.9/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/slot-deposit-pulsa/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/bet88/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/server-thailand/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/s88gcr/ jakartaonline88 bintangbet88 https://steinbergusers.com/ pgsoft slot777