ठाणे (कविराज चव्हाण) : ‘हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५०व्या शहिदी समागमानिमित्त उल्हासनगरमध्ये विविध ठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी हिंद दि चादर या कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले आणि या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.
श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५०व्या शहिदी समागमानिमित्त उल्हासनगर शहरात विविध ठिकाणी आदर, श्रद्धा आणि सन्मानपूर्वक विशेष बैठकींचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत गुरु साहिबांच्या अद्वितीय त्याग, धर्मरक्षणासाठी दिलेल्या बलिदानाची आणि मानवतेसाठी केलेल्या सेवाभावाची भावपूर्ण आठवण रामेश्वर नाईक यांनी यावेळी उल्हासनगरमधील समाजाच्या प्रतिनिधींना करून दिली.

गुरु तेग बहादुर जींचे जीवन हे “धर्म, सत्य आणि मानवतेच्या रक्षणासाठी केलेल्या संघर्षाचे प्रतीक” आहे. त्यांचे विचार आणि शिकवणी आजही समाजाला ऐक्य, सहिष्णुता आणि प्रेमाचा संदेश देतात असे रामेश्वर नाईक यांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार कुमार आयलानी आणि समितीचे प्रमुख व्यक्ती उल्हासनगरमधील विविध कार्यक्रमात उपस्थित होते.


